ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात सुधारणा करावी

  • स्लॅक टाईम’ आधारित वेळापत्रकाचा प्रवाशांना नाहक फटका
  • वेळापत्रकातील त्रुटी दूर करण्यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे रेल्वेला पत्र

रत्नागिरी:  मुंबई आणि कोकणला जोडणारी अत्यंत पसंतीच्या दैनंदिन सेवा असलेल्या ११००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातील त्रुटींमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. वेळापत्रकात अनावश्यक ‘स्लॅक टाईम’ (ढीला वेळ) असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून, प्रवाशांनी वेळापत्रकात त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे. यासाठी अखंड कोकण रेल्वे सेवा समितीने कोकण रेल्वे वेळापत्रक पाठवले आहे.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने पाठविलेल्या निवेदनानुसार ०६ ऑगस्ट २०२५ रोजी तुतारी एक्स्प्रेस दादरहून ००:०७ वाजता सुटून सावंतवाडी येथे १२:५९ वाजता पोहोचली. जरी अंतिम गंतव्यस्थानी सावंतवाडी येथे पोहोचण्यास केवळ ९ मिनिटांचा उशीर झाला असला तरी, संपूर्ण प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी गाडी वेळेच्या खूप आधी पोहोचली आणि बराच वेळ थांबून राहिली.


लक्ष वेधता येतील असे महत्त्वाचे मुद्दे

  • वेळेआधी पोहोचणे: खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड यांसारख्या स्थानकांवर गाडी १० ते २० मिनिटे आधी पोहोचते.
  • रत्नागिरी येथील दीर्घ थांबा: सर्वात मोठी विसंगती रत्नागिरी येथे दिसून येते. ही गाडी ठरलेल्या वेळेच्या ६३ मिनिटे आधी, म्हणजेच सकाळी ०७:५७ वाजता पोहोचली आणि तब्बल ६८ मिनिटे थांबली.
  • अनावश्यक वेळ वाया: एवढा ‘स्लॅक टाईम’ असूनही गाडीने शेवटच्या टप्प्यावर ९ मिनिटांचा उशीर केला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
    हा प्रकार एक-दोनदा नाही, तर नियमितपणे घडत असल्याचे प्रवासी संघटनेने म्हटले आहे. अनावश्यक वेळ देऊन तयार केलेल्या या वेळापत्रकामुळे हजारो प्रवाशांचा अमूल्य वेळ विनाकारण वाया जात आहे. कोणत्याही स्थानकावर तासभर थांबण्याची गरज नसतानाही हे घडत आहे.
    यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रवाशांनी खालील मागण्या केल्या आहेत
  • वेळापत्रकातील अतिरिक्त ‘स्लॅक टाईम’ कमी करून शेवटच्या टप्प्यांवर योग्य प्रकारे वाटप करावा.
  • रत्नागिरी आणि इतर स्थानकांवरील अनावश्यक आणि दीर्घ थांबे कमी करावेत.
  • गाडीचे संपूर्ण वेळापत्रक वस्तुनिष्ठपणे आणि प्रवाशांच्या सोयीनुसार पुन्हा तयार करावे.
    अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला कोकणवासीय प्रवाशांचा आदर करून वेळेवर आणि सुटसुटीत सेवा द्यावी अशी  विनंती केली आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button