महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजी
उरणमध्ये ‘रत्नागिरी ८’ भात वाणाची चारसूत्री पद्धतीने लागवड

- शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राचे मार्गदर्शन
उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील आवरे गावातील शेतकरी काळुराम पोशीराम गावंड यांच्या शेतात ‘रत्नागिरी ८’ या भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने यशस्वीरित्या लागवड करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी श्रीमती अर्चना सूळ नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रायोगिक उपक्रम राबवण्यात आला.
या प्रात्यक्षिकादरम्यान, उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना ४ सूत्री भात लागवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच या आधुनिक लागवड पद्धतीमुळे होणारे विविध फायदे समजावून सांगण्यात आले.
चार सूत्री भात लागवड पद्धतीचे फायदे
- उत्पादन वाढ : या पद्धतीमुळे भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
- पाण्याचा कार्यक्षम वापर : पाण्याची बचत होते आणि पाण्याचा अधिक प्रभावीपणे वापर होतो.
- खतांचा योग्य वापर : खतांचा योग्य वापर होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
- रोग आणि कीड नियंत्रण: पिकांवरील रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
- श्रम आणि वेळेची बचत : पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेळात आणि कमी श्रमात लागवड करता येते.