महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीची ठाणे येथे राज्यव्यापी बैठक

  • महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित
  • प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीने विविध संघटना प्रतीनिधींची राज्यव्यापी बैठक ठाणे येथे महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेच्या सहकार्याने आयोजित केली.

राज्यातील नगरपरिषदा आणि नगर पंचायती मधील कामगार, कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित प्रश्न सोडविण्यााठी या महत्वपूर्ण राज्यव्यापी बैठकीचे प्रस्तावित राज्य समन्वयक कामगार नेते अनिल जाधव यांनी केले त्यावेळी त्यांनी सांगितले कामगार चळवळ काल, आज आणि उद्या याचा उदाहरणासह आढावा घेतला.

राज्य संघटक कामगार नेते संतोष पवार यांनी कामगार संघटना ही तरूणांच्या सहभागाने मजबूत होणार आहे. या पुर्वी २५-३० वर्षांपूर्वी आम्ही तरूण होतो तेव्हा एखाद्या कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये उपस्थीत राहण्याची संधी मिळाली तर सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन स्विकारून भरभरून उर्जा घेऊन दिलेल्या सुचनांचे आम्ही त्याकाळी मोबाईलची सुविधा नसतानाही तंतोतंत सर्व सुचनांची आमलबजावणी आनंदाने आणि उत्साहाने करायचो.

या राज्यव्यापी बैठकीमध्ये तरूणांचा सहभाग आणि उत्साह अतीशय योग्य अपेक्षेप्रमाणे होता. त्यामुळे भावी काळात चळवळ बळकट होणार अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्याला कायद्यानुसार किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी ची योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे आणि याकडे आपण सर्वांनी जबाबदारीने पाहीले पाहिजे याची सुरुवात स्वत: पासून केली पाहिजे असे मत व्यक्त केले पाहिजे.
ज्येष्ठ कामगार नेते प्रा. अण्णा पाटील यांनी विचार व्यक्त करताना सांगितले वर्षानुवर्षे कंत्राटी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम केलेच पाहिजे याकडे सर्व संघटना प्रतीनिधींनी लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे तसेच कामगार चळवळ मजबूत करण्यासाठी, बांधणी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.

स्वच्छता निरीक्षकांचे नेते लक्ष्मण पुरी यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यातील स्वच्छता निरीक्षकांचे महत्त्व आणि स्वच्छता निरीक्षकांच्या व्यथा मांडल्या तसेच पदोन्नतीची संधी आणि जाॅबचार्टची आवश्यकता या विषयावर बैठकीचे लक्ष वेधले. ज्येष्ठ कामगार नेते ॲड सुरेश ठाकूर यांनी १९९० सालापासून गॅट करार त्यानंतर सातत्याने झालेले कामगार क्षेत्रातील बदल. आता कामगारांचे संघटन मजबूत करणे ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.

राज्यव्यापी बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते डॉ. डि. एल. कराड यांनी कामगार कायद्यातील बदल कामगारांचे भवितव्य अंधकारमय करणारे आहेत हे ओळखून राज्यातील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन फक्त सध्या स्थीतीत असलेले कामगारच नाही तर पुढील पिढ्यांचेही कसे आयुष्याचे वाटोळे होणार हे समजावून सांगितले आणि यावर एकच पर्याय सर्व विचार धारेच्या संघटनांनी कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकत्र व्यापक लढा देण्यासाठी सर्व तरूण कामगार – कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांनी आता संघटनेमध्ये सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे. जबाबदारी घेऊन प्रामाणिक पणे काम करण्याची आवश्यकता आहे असे तरूणांना आवाहन केले.आम्ही देखील यापुढे राज्य व्यापी लढा यशस्वी करण्यासाठी पूर्ण सक्रिय सहभागी होणार असे मत प्रत्येक तरुण कार्यकर्त्याने या बैठकीत मांडले. या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली आहे.


१)राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील कामगार – कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्याचे निवेदन हजारो कामगारांच्या प्रत्यक्ष सह्या घेऊन निवेदन राज्य शासनाला देण्यात येईल हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
२) प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायत कार्यालयावर समोर एक दिवसीय धरणे आंदोलन आणि हे करूनही राज्यसरकारने या मागण्यांकडे नजर आंदाज करून दूर्लक्ष केले तर या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यव्यापी मोर्चा मुंबई येथे धडकणार हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.


ही बैठक यशस्वी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शेषराव शिरसाट, अतुल आठवले, शिवराज शिंदे, सतिश भोईर, किरण लाखे, दत्ता घुगे, अजित मोरे, याकूब मद्रासी, भोला खोब्रागडे यांनी तसेच महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर राज्यव्यापी बैठक यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संघटणेचे अध्यक्ष लक्ष्मण पुरी आणि संपूर्ण टिमने उत्तम नियोजन केले त्यामुळे राज्यव्यापी बैठक यशस्वी पार पडली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button