महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

‘हर घर तिरंगा’ अंतर्गत बँक ऑफ इंडियामार्फत बाईक रॅली


रत्नागिरी, दि. १२ : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय व नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (नराकास) यांच्या संयुक्त विद्यमाने आज बँकर्स बाईक रॅली बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय शिवाजीनगर ते जयस्तंभ आणि परत जयस्तंभ ते बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय शिवाजीनगर पर्यंत काढण्यात आली.


बाईक रॅलीचा शुभारंभ विभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया तथा अध्यक्ष नराकास रविंद्र देवरे यांच्या हस्ते झाला. या रॅलीमध्ये उपविभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया अंजनी कुमार सिंग आझाद, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, नराकास सदस्य सचिव रमेश गायकवाड, झोनल सेक्रेटरी बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशन किरण खोपडे, ललित प्रकाश दीपस्तंभ कार्यालय, भारतीय तटरक्षक वायू अवस्थानचे 24 जवान तसेच इतर नराकास सदस्य कार्यालये, शहरातील सर्व बँकांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सर्वांनी रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेवटी बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे श्री कानसे व श्री गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले व बाईक रॅलीची सांगता झाली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button