क्राईम कॉर्नरमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
मूळच्या झारखंडमधील तरुण कामगाराची रत्नागिरी आत्महत्या

रत्नागिरी : शहरातील पेठ किल्ला येथे मुळच्या झारखंडमधील कामगाराने तो राहत असलेल्या घरी गळफास लावून आत्महत्या के केल्याचे घटना घडली. मंगळवार दि. १७ जून रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
अरमानकुमार नरेश तुरी (२०, मूळ रा. झारखंड सध्या रा. पेठ किल्ला, रत्नागिरी ) अरमानकुमार हा येथील एका कंपनीमध्ये कामाला होता. मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घराच्या बाराच्या सुमारास गळफास घेतला. ही बाब शहर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.