रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येत श्रीराम दर्शनाची संधी !
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्या : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येत श्रीराम दर्शनाची संधी !
रत्नागिरी : जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ देण्याचे नियोजित असून, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांमार्फत पहिल्या टप्प्यांमध्ये पवित्र तीर्थ क्षेत्र असलेले प्रभू श्री राम यांची जन्मभूमी असणार्या अयोध्या या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले आहे.
राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला योजनेचा एकवेळ लाभ मिळणार आहे. योजनेंतर्गत प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदींचा समावेश असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार असावे. राज्याचा रहिवासी असावा व वय वर्षे 60 वरील ज्येष्ठ नागरिक असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. प्रवाशांच्या निवड प्रक्रियेमध्ये प्रथम येणार्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेकरिता 800 प्रवाशी इतकी मर्यादा आहे. पहिल्या टप्याामध्ये पवित्र तीर्थ क्षेत्र असलेले प्रभू श्री राम यांची जन्मभूमी असणार्या अयोध्या या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी स्थळाची निवड केली आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, ता. जि. रत्नागिरी, दू. क्र. 02352-230957 येथे संपर्क करावा.