महाराष्ट्रराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

सावधान !! रेल्वेतील धोक्याची साखळी क्षुल्लक करणासाठी खेचाल तर मोजावा लागेल भारी दंड!

  • मध्य रेल्वेने ११,४३४ प्रकारणांमध्ये वसूल केला ६३ लाख २१ हजारांची दंड वसुली

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना अलार्म चेन (धोक्याची साखळी) पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन-
अलार्म चेनचा गैरवापर हा गुन्हा आहे आणि त्यामुळे सहप्रवाशांची गैरसोय होऊ शकते.

मुंबई : रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (एसीपी) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ट्रेनच्या लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर (गार्ड) यांना सतर्क करण्यासाठी अलार्म चेन आणीबाणीच्या परिस्थितीत खेचण्यासाठी तयार केलेली आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि रेल्वे सेवांची वक्तशीरपणा राखण्यासाठी ट्रेनमध्ये अलार्म चेनचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

असे निर्दशनास आले आहे की प्रवासी उशीरा पोहोचणे, उतरणे/मधल्या स्थानकांवर चढणे इत्यादी क्षुल्लक कारणांसाठी एसीपीचा गैरवापर करत असून अलार्म चेनचा गैरवापर हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. यामुळे एक वर्षापर्यंत कारावास, १००० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेचा समावेश असू शकतो.

मध्य रेल्वे एसीपी च्या अशा घटनांवर लक्ष ठेवून आहे. एप्रिल-२०२३ ते जून-२०२४ या कालावधीत (दि. २८.६.२०२४ पर्यंत), मध्य रेल्वेने अलार्म चेनच्या गैरवापराची ११,४३४ प्रकरणे नोंदवली. रेल्वे कायद्याच्या १४१ नुसार ९६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून ६३.२१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

विभागनिहाय प्रकरणे, अटक केलेल्या व्यक्ती आणि दंड वसूल करण्यात आलेला तपशील खालीलप्रमाणे आहे.


मुंबई विभाग
प्रकरणे- ४३८७, अटक ३७४१, दंड वसूल – रु.२३.४७ लाख
भुसावळ विभाग
प्रकरणे-२९३१, अटक २८२४, दंड वसूल – रु. २१.७६ लाख
नागपूर विभाग
प्रकरणे-१७०६, अटक १४०४, दंड वसूल – रु. ८.७१ लाख
पुणे विभाग
प्रकरणे-१९९२, अटक १४४०, दंड वसूल – रु.७.७३ लाख
सोलापूर विभाग
प्रकरणे- ४१८, अटक २४८, दंड वसूल – रु.१.५४ लाख

अलार्म चेन खेचण्याच्या वैध कारणांमध्ये आगीच्या घटना, आरोग्य आणीबाणी, गुन्हेगारी प्रकरणे किंवा ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना अपघात यासारख्या आणीबाणीचा समावेश होतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि कल्याणाची खात्री करण्यासाठी या परिस्थितींकडे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
ट्रेनमधील एसीपीच्या कृतींचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनवर परिणाम होत नाही तर त्यामागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो ज्यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. पुढे एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

प्रवाशांना सूचित केले जाते की गैर-आणीबाणीच्या परिस्थितीत, मदतीसाठी पर्यायी मार्ग आहेत. ते ट्रेनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतात, जसे की प्रवासी तिकीट परीक्षक (टीटीई), १३९ वर Rail Madad डायल करू शकतात किंवा सहप्रवाशांची मदत घेऊ शकतात.

मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना त्यांच्या ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या किमान तीस मिनिटे अगोदर स्थानकावर पोहोचून त्यांच्या प्रवासाचे जबाबदारीने नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. लवकर पोहोचणे केवळ त्रासमुक्त प्रवास सुनिश्चित करत नाही तर रेल्वे सेवांची वक्तशीरता राखण्यात देखील योगदान देते.

मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना अलार्म चेन जबाबदारीने वापरण्याचे आवाहन केले आहे आणि वास्तविक आपत्कालीन परिस्थिती वगळता ती ओढण्यापासून परावृत्त करीत आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, प्रवासी सुरक्षितता, वक्तशीरपणा आणि रेल्वे सेवा सुरळीत चालवण्यात योगदान देतात.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button