

सौ. वैशाली घनश्याम कडू या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या साप्ताहिक प्रांजलच्या संपादिका आहेत . त्या एक उत्कृष्ठ महिला पत्रकार व आदर्श गृहिणी सुद्धा आहेत. टायपिंग करून पत्रकारिता करून कुटुंब उत्तमरित्या सांभाळण्याचे काम वैशालीलाई करत असून आजपर्यंत आपल्या पत्रकारितेतून बहुजन समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अनेक समस्यांची सोडवणूक, त्यांनी आपल्या पत्रकारितेतून केली आहे. त्यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य पाहून त्यांना अनेक विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत. वैशालीताई यांचे जीवन सर्व महिलांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे.