खेड-सातारा जोडणाऱ्या रघुवीर घाटातील दरड हटवली ; वाहतूक सुरू

Team RatnagiriLive
1 Min Read
  • बांधकाम विभागाच्या तत्परतेने वाहतूक सुरळीत; विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा!

खेड (रत्नागिरी): खेड तालुका आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात यंदाच्या पावसाळ्यातील पहिली दरड कोसळण्याची घटना सोमवारी रात्रीच्या वेळी घडली होती. यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) (सार्वजनिक बांधकाम विभाग खेड) अधिकाऱ्यांनी केलेल्या तत्काळ उपाययोजनांमुळे बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही दरड यशस्वीरित्या हटवण्यात आली आणि रघुवीर घाटातील वाहतूक पूर्ववत झाली.

दरम्यान, मार्गावरील दरड हटवल्यामुळे कांदाटी खोऱ्यातील आकल्पे गावातील खेड आणि खोपी येथील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच प्रवाशांनी सुखरूप प्रवास पूर्ण केला. दरवर्षी रघुवीर घाटात दरड कोसळल्याने कांदाटी खोऱ्यातील सुमारे २१ गावांचा संपर्क तुटतो. पण, यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने घाटातील आणि इतर दरडग्रस्त भागांवर विशेष लक्ष ठेवले आहे.
सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतरही विभागाच्या सतर्कतेमुळे आणि जलद कार्यवाहीमुळे वाहतूक विस्कळीत न होता वेळेवर पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment