- शिक्षण संचालकांचे संस्थाचालक, मुख्याध्यापकांना निर्देश
रत्नागिरी, दि २३ : राज्यातील खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन पावलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा देणारा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवून देण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यात आले असून, येत्या ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ही सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
