रत्नागिरी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाली येथील हेलिपॕडवर आगमन झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. नाणीज येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
