रत्नागिरीत विजांसह अवकाळी पाऊस

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी दि ९ : रत्नागिरी शहर परिसरात मध्यरात्री नंतर एक वाजण्याच्या सुमारास विजांसह अवकाळी पाऊस झाला. आंबा बागांमध्ये नुकतीच फवारणी केलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सोमवारी मध्य रात्रीनंतर पडलेला पाऊस चिंता वाढवणारा ठरला आहे.

अलीकडेच बागांची साफसफाई करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांमध्ये फवारणीचे टप्पे सुरू केले होते. सोमवारी मध्यरात्री नंतर (मंगळवारी) कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे केलेले फवारणीचे काय होणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

रत्नागिरी शहरात रात्री एक वाजल्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस जवळपास अर्धा तास सुरू होता.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment