मंडणगडमधील तुळशी-माहू घाटातील वाहतूकही सुरळीत

Team RatnagiriLive
1 Min Read

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील तुळशी- माहू घाटात राष्ट्रीय महामार्गावर पावसमुळे रस्त्यावर आलेली दरड दगड व माती हटविण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

रस्त्यावर कोसळलेली दरड हटवून वाहतुकीसाठी मोकळा झालेला तुळशी माहू घाट

मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मंडणगड तालुक्यातील तुळशी माहू घाटासह राजापूर तालुक्यामधील कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात रस्त्यावर दरड आल्यामुळे या दोन्ही घाट रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कोल्हापूर राजापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा  घाटातील वाहतूक तेथील दरड हटवून सुरळीत करण्यात शुक्रवारी सायंकाळी उशिराने यश आले.

याचबरोबर मंडणगड  तालुक्यातील तुळशी माहू घाटात कोसळलेली दरड जेसीबीच्या मदतीने हटवण्यात आली असून आता या घाट रस्त्यावरील वाहतूक देखील सुरळीत सुरू झाली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment