रत्नागिरी जिल्ह्याच्या आपदा सखी प्रशिक्षणाला प्रांरभ
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/02/img-20230204-wa00091340618628876642420-780x470.jpg)
रत्नागिरी : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य आपती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने व एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी, धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधिक्षक, रत्नागिरी यांचे प्रमुख मार्गदर्शनाने आयोजित बॅच क्रमांक 3 – आपदा सखी प्रशिक्षणाचे उदघाटन सोहळा दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न झाला.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आवार येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अधीक्षक अभियंता रत्नागिरी पाटबंधारे विभाग वैशाली नारकर, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक
भूमी अभिलेख एन
. एन. पटेल, जिल्हा आपती व्यवस्थापन अधिकारी, अजय सूर्यवं
शी, मुख्य प्रशिक्षक बिमल नाथवानी, सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, रत्नागिरी मिलिंद जाधव आ
दी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी शुंभागी साठे,
अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग वैशाली नारकर, अधीक्षक भूमी अभिलेख पटेल,
पत्रकार शोभना कांबळे, जिल्हा कृषि
अ
धीक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतलेला आपदा सखींचे कौतुक केले. आपल्याला मिळालेल्या संधीचे सार्थक करा
, अशा शुभेच्छा दिल्या.
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/02/img-20230204-wa00062799652691679432043-1024x475.jpg)
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/02/img-20230204-wa00091340618628876642420-1024x459.jpg)
सही बॅच ही 02 फेब्रुवारी 2023 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत 12 दिवसाचे निवासी प्रशिक्षणाची असुन त्यामध्ये एकूण 60 महिला स्वयंसेवकांनी भाग घेतलेला आहे. सदर स्वयंसेवकांना 12 दिवासाचे आपती व्यवस्थापन विषयक निवासी प्रशिक्षण,निवास व भोजनाची व्यवस्था, प्रशिक्षणाला येणा जाण्याचा प्रवासभता, प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर प्रमाणपत्र, ओळखपत्र, विमा कवच, ड्रेस कोड (टि-शर्ट), Safety Kit या सुविधा देण्यात येणार आहेत.