महाराष्ट्र

आंबा बागायत, मच्छीमारीवर रिफायनरीचा परिणाम ; पर्यावरण तज्ञांसोबत उद्या बैठक

रिफायनरीसंबंधी माती सर्वेक्षण कार्यवाहीत प्रशासनाने नागरिकांशी साधला संवाद

रत्नागिरी : मौजे बारसू. ता. राजापूर येथील प्रस्तावीत रिफायनरीच्या अनुषंगाने प्रस्तावीत गावांमध्ये माती सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आलेले आहे. हे काम सुरु होण्यापूर्वी आज दि.25 एप्रिल 2023 रोजी सकाळी सर्वेक्षणाच्या ठिकाणी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उपस्थित जमावाला मा. पोलिस अधिक्षक. रत्नागिरी यांनी योग्य प्रकारे चर्चा करुन परिस्थिती हाताळलेली आहे.
तसेच दुपारी २ वाजताच्या दरम्यान पुन्हा एकदा सर्व्हेक्षणाच्या दिशेने येत असणा-या जमावाला मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी, मा. पोलिस अधिक्षक, रत्नागिरी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, मा. उपविभागीय अधिकारी राजापूर मा. प्रादेशिक अधिकारी, मऔविम, रत्नागिरी. मा. कार्यकारी अभियंता, मऔविम, रत्नागिरी व मा. तहसिलदार, राजापूर यांनी योग्यरित्या सामोरे जात त्यांच्याशी चर्चा केली. त्यापैकी १५ ते २० आंदोलन प्रतिनिधींना चर्चेसाठी सर्वेक्षणाच्या ठिकाणी बोलावण्यात आले.

या बैठकीस उपस्थित १५ ते २० ग्रामस्थांशी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षणाच्या ठिकाणी चर्चा केली. चर्चेदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी आपले म्हणणे मांडले त्यावर प्रथम मा. पोलिस अधिक्षक, रत्नागिरी यांनी त्यांचे कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. व प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी महिला भगिनींना आंदोलनासाठी नाहक प्रवृत्त करु नये, असे आवाहन केले.


तसेच जिल्हाधिकारी यांनी आंबा बागायती क्षेत्र तसेच मच्छीमार व्यवसाय यावर रिफायनरी प्रकल्पाचा दुष्परिणाम होणार नाही, याविषयी माहिती दिली. चर्चेअंती प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मागणीनुसार चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ञासोबत गुरुवार, दि. २७ एप्रिल २०२३ रोजी बैठक ठेवण्यात आलेली आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button