महाराष्ट्र

विरोधानंतरही मुंबई-गोवा महामार्गावर राजापुरात टोल वसुली सुरू

गुरुवारी राजापुरात धडक देत विचारणार जाब

हातिवले येथील टोल विरोधात माजी खासदार नीलेश राणे आक्रमक

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपादरीकरणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये, अशी जनतेची आग्रही मागणी असतानाही राजापूर तालुक्यातील हातीवले गावात बुधवारपासून टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. याविरुद्ध भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले असून याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी ते राजापूरात दाखल होतं आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली सात वर्षाहून अधिक काल उलटला तरीही पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही टोल वसुली करू नये अशी जनतेची आग्रही मागणी होती. तरीही राजापूर तालुक्यातील हातीवले येथे टोल नाका उभारण्यात आला.

या बाबत तेथील जनतेने माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली होती. टोल वसुलीला विरोध नाही. मात्र महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही टोल वसुली करू नये अशी भूमिका निलेश राणे यांनीही घेतली होती.

त्यानंतर वसुलीची प्रक्रिया थांबली होती. मात्र आता पुन्हा बुधवारपासून हातीवले येथे टोल वसुलीला सुरुवात झाली. ही वसुली अनधिकृत असून उद्या मी माझ्या सहकाऱ्यांसोबत १० वाजता स्वतः टोल वर जाणार आणि टोल बंद पाडणार, टोलला विरोध नाही पण काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर विषय सुटल्याशिवाय टोल सुरू करायला देणार नाही, अशी आक्रमक भूमिका निलेश राणे घेतली आहे. तसे ट्विट त्यांनी केले आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button