ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

दरड कोसळल्याने कोकणला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटातील वाहतूक ठप्प

राजापूर  : कोकणला कोल्हापूरशी जोडणारा अणुस्कुरा  घाट पावसामुळे दरड कोसळल्याने ती हटवेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसामुळे घाटातील दरड मार्गावर कोसळली आहे.


या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीने ही दरड बाजूला हटवण्याचे काम सुरु आहे.

मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टींग मशीनदेखील घटनास्थळी मागवण्यात आले आहे. ही दरड हटवल्यानंतर या मार्गावरुन होणारी वाहतूक सुरु केली जाईल. तोपर्यंत आज रात्री अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद केला आहे, अशी माहिती राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button