किती हा पाऊस..! आम्ही बसायचं कुठे?

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीकाळात माणसांपुढे उदभवणाऱ्या समस्या या बातम्यांचा विषय बनतात. मात्र, मुक्या प्राण्यांचे काय? त्यांचा कोण विचार करणार? अशी व्यथा मांडणारं एक बोलकं छायाचित्र रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. जयंतराव जोशी यांनी टिपलं आहे.

छायाचित्र सौजन्य : श्री. जयंत जोशी

तुम्ही माणसं घरातल्या लोडाला टेकून आजूबाजूला कोसळणारा पाऊस हा दारं आणि खिडक्यांमधनं एन्जॉय करता… पण पावसात भिजल्यामुळे ओल्या अंगाचे आम्ही तुमच्या घरात नाही, पण नुसते पडवीत आडोशाला आलो तरी आम्ही अंग झटकताना पाणी उडतं म्हणून हाकलून देता, अशी या श्वानाची व्यथा मांडण्यासाठी हे छायाचित्र पुरेसं आहे.

पावसा, तु पडायला हवासच पण, पडायचं ते किती रे ? आता तूच सांग… इतक्या पावसात आम्ही मुक्या प्राण्यांनी बसायचं तरी कुठे? असा प्रश्न हा छायाचित्रातला हा श्वान विचारत नसेल कशावरून?

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment