रत्नागिरी : राज्यात लागू झालेल्या विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर २५ मे २०२६ रोजी नागपूर रेल्वे स्थानक येथून बुद्धगयासाठी नियोजित विशेष रेल्वे तसेच ३ जून २०२६ रोजी दादर मुंबई येथून बुद्धगयासाठी सुटणारी विशेष रेल्वे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या आहेत.
भाविकांच्या सोयीचा विचार करून पुढील नियोजनाबाबत लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असून, त्याची माहिती सर्व संबंधितांना अधिकृत माध्यमांतून कळविण्यात येईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आसे आवाहन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.
