नागपूर व दादर येथून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत बुद्धगयासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी :  राज्यात लागू झालेल्या विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर २५ मे २०२६ रोजी नागपूर रेल्वे स्थानक येथून बुद्धगयासाठी नियोजित विशेष रेल्वे तसेच ३ जून २०२६ रोजी दादर मुंबई येथून बुद्धगयासाठी सुटणारी विशेष रेल्वे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या आहेत.

भाविकांच्या सोयीचा विचार करून पुढील नियोजनाबाबत लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असून, त्याची माहिती सर्व संबंधितांना अधिकृत माध्यमांतून कळविण्यात येईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आसे आवाहन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment