रत्नागिरी किनारपट्टीवर वादळसदृश परिस्थिती

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : हवामानात बदल झाल्याचे गुरुवारी सकाळपासून जाणवू लागले आहे. रत्नागिरी शहर परिसरात आज सकाळपासूनच वाऱ्याचा वेग वाढला असून नागरिकांना दारे खिडक्या बंद करून घ्याव्या लागतील, इतका वाऱ्याचा वेग होता.


गुरुवारी सकाळी किनारपट्टीवरील हवामानात अनपेक्षित बदल अनुभवायला मिळाला. सकाळपासूनच वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे झाडे अक्षरशः पिळवटून निघत होती तर नागरिकांच्या घरांची दारे तसेच खिडक्यांची तावदाने एकमेकांवर जोरजोराने आदळत होती. भल्या सकाळी निर्माण झालेली वादळ सदृश्य परिस्थिती अकरा वाजेपर्यंत थांबली नव्हती.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment