सावधान !! पुढील तीन-चार तासात जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : पुढील ३-४ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री तसेच शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागाला पावसाने दणका दिला. यामध्ये विशेषता रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरासह राजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊल झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या उत्तर भागात मात्र पावसाचा तितकासा जोर नव्हता. मात्र शनिवारी रात्री हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार पुढील तीन-चार तासात विजांच्या कडकडाटसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment