‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत केळ्ये येथे चारसुत्री पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि. ९ : रत्नागिरी तालुक्यातील मौजे केळ्ये येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत शेतकरी काशिनाथ बापट यांच्या प्रक्षेत्रावर चारसुत्री पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. सीआरए तंत्रज्ञाने फळबाग लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार, तालुका कृषी अधिकारी रत्नागिरी विनोद हेगडे, तंत्र अधिकारी प्रमोद पाटील, तंत्र अधिकारी श्रीमती काळे, मंडळ कृषी अधिकारी श्री. मासाळ आदी अधिकारी आणि कर्मचारी शेतावर उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment