भारतातून श्रीलंकेत फेरीबोटीने अवघ्या ३ तासात पोहोचता येणार

Team RatnagiriLive
1 Min Read

भारत -श्रीलंका फेरीबोट सर्व्हिस मंगळवारपासून

चेन्नई : भारत श्रीलंका दरम्यान अत्यंत कमी तिकीट दरात प्रवास करण्याची संधी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फेरीबोट सर्विसमुळे उपलब्ध होणार आहे. बारा वर्षांपूर्वी हालचाली सुरू झालेल्या या प्रकल्पाला अखेर 10 ऑक्टोबर 2023 चा मुहूर्त मिळाला आहे. या फेरीबोट सेवेमुळे दोन्ही देशांमध्ये तीन तासांमध्ये प्रवास करणे शक्य होणार आहे.

तामिळनाडूतील नागापट्टीणम तसेच श्रीलंकेतील जाफीनामधील कणकेसंथुराई फेरी बोट सेवे संदर्भात दोन्ही देशांमध्ये झालेल्या MoU नुसार ही सेवा दिनांक 10 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत ही फेरीबोट चालवली जाणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment