रत्नागिरीत आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबरला मेळावा

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी, दि.31 : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


या मेळाव्यामध्ये आंबा पिकावरील रोग-किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, आंबा पिकांसाठी मानांकन नोंदणी प्रमाणपत्र इ. विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील शास्त्रज्ञ आंबा पिकावरील कीड- रोगावरील उपाय योजनेसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आंबा बगायतदारांनी मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे.

000

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment