रत्नागिरी : शहरातील काँग्रेसचे एक कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.
अश्फाक काद्री यांची निवड झाली असल्याचे समजता विधान परिषदेच्या माजी आमदार श्रीमती हुस्नबानु खलीफे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी कोकण म्हाडा अध्यक्ष रमेश कीर तसेच अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
