ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

महामार्ग चौपदरीकरणातील चिखल-मातीने आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडांची दुर्दशा

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडांमध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील चिखल माती आल्यामुळे पार दुर्दशा झाली आहे. मागील काही दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी आरवली परिसरात पुराचे पाणी भरले होते. पुराच्या पाण्याबरोबर कुंडांच्या दोन्ही बाजूने गेलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गीकांमधील चिखल-माती आली आहे.

ब्रिटिश काळापासून जपलेली आरवली येथील कुंडे

गडनदीच्या किनारी असलेली गरम पाण्याची कुंडे ही सखल भागात असल्यामुळे बाजूने गेलेल्या गड नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी कुंड परिसरात भरते. मात्र पूर ओसरल्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर कुंडामधील पाणी पुन्हा पूर्वीप्रमाणे होत असे. मात्र यावेळी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने निसर्गाची देणगी लाभलेल्या या कुंडांचा विचार न करताच महामार्गाचे काम केल्यामुळे याचा फटका आरवली येथील या गरम पाण्याच्या कुंडांना बसला आहे. सोमवारी आलेल्या पुरामुळे कुंडांच्या बाजूने गेलेल्या महामार्गाच्या कामामधील चिखल माती कुंडांमध्ये आली आहे. यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात कधी नव्हे इतकी कुंडांची दुर्दशा झाली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीमुळे आरवली कुंडांची झालेली अवस्था

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button