निवडणूक कालावधित नागरिकांनी सी-व्हिजील, एनजीएसपी व १९५० टोल फ्री सुविधांचा वापर करावा

Team RatnagiriLive
1 Min Read
  • खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांचे आवाहन

रत्नागिरी, दि. १७ : जिल्ह्यातील पाचही विधानसभा क्षेत्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी अथवा पक्षांनी मतदारांना कोणतेही प्रलोभन, कोणतेही साहित्य वाटप करीत असल्याचे तसेच कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास सी-व्हीजील, एनजीएसपी व टोल फ्री क्रमांक 1950 या भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा लाभ घेऊन त्वरित तक्रार अथवा माहिती देण्यात यावी, असे आवाहन खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांनी केले आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत होण्यासाठी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणारी विधानसभा निवडणूक शांततेत तसेच पारदर्शक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment