जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज मार्गी लावा : जिल्हाधिकारी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : ज्या विभागाकडे प्रलंबित अर्ज आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.*
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी मागील प्रलंबित अर्जांचाही आढावा घेतला. आज नव्याने 5 अर्ज दाखल झाले आहेत. संबंधित विभागाने मागील प्रलंबित अर्जांसह याची निर्गती करावी.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment