दरड कोसळलेल्या अणुस्कुरा घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : पावसामुळे दरड कोसळून वाहतूक बंद पडलेल्या आणि राजापूर कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटातील घटनास्थळाला रविवारी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली.

राजापूर येथील बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आज बैठकीद्वारे आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी अनुस्कुरा घाटामध्ये रस्त्यावर दरड कोसळलेल्या ठिकाणास भेट देऊन पाहणी केली व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या तसेच अन्य धोकादायक ठिकाणांचीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment