मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित काम अजूनही संथ गतीने!

Team RatnagiriLive
2 Min Read

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामाबाबत अनेकांनी अनेक आश्वासने दिली. मात्र अजूनही हे काम संथ गतीने सुरू आहे. संगमेश्वर मध्ये आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड दरम्यान अनेक ठिकाणी महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. चिखलमय महामार्गामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे महामार्गावर सर्व्हिस रोडची झालेली अवस्था.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

  • रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचे काम अजूनही संथगतीने सुरू आहे. संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यात येणारा भाग आणि लांजा येथे कामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून, पावसाने चिखल झाल्याने वाहनचालकांना अडचणी येत आहेत.
    महामार्गाची वैशिष्ट्ये
  • ४ पदरी महामार्ग: हा ४६०-४७१ किलोमीटर लांबीचा महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई आणि गोव्यादरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल.
  • पर्यटनाला चालना: कोकण किनारपट्टीवरील अनेक अप्रकाशित पर्यटनस्थळे यामुळे सहज उपलब्ध होतील, ज्यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
  • आर्थिक विकास: वेगवान कनेक्टिव्हिटीमुळे लॉजिस्टिक्स पार्क्स, कृषी-आधारित उद्योग आणि वेअरहाऊसिंग सुविधांना चालना मिळेल. मत्स्यपालन, फलोत्पादन आणि हस्तकला क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मुंबई आणि पुणे येथील बाजारपेठांमध्ये उत्पादने पोहोचवणे सोपे होईल.
    मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असले तरी, आता ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पावसाळ्यामुळे काही ठिकाणी कामाला खीळ बसली असली तरी, जून २०२५ पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते पण आता तोही मुहूर्त हुकला आहे.
  • हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
  • छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
  • पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment