उरणमध्ये ‘रत्नागिरी ८’ भात वाणाची चारसूत्री पद्धतीने लागवड

Team RatnagiriLive
1 Min Read
  • शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राचे मार्गदर्शन

उरण (विठ्ठल ममताबादे ):  उरण तालुक्यातील आवरे गावातील शेतकरी काळुराम पोशीराम गावंड यांच्या शेतात ‘रत्नागिरी ८’ या भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने यशस्वीरित्या लागवड करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी श्रीमती अर्चना सूळ नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रायोगिक उपक्रम राबवण्यात आला.
या प्रात्यक्षिकादरम्यान, उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना ४ सूत्री भात लागवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच या आधुनिक लागवड पद्धतीमुळे होणारे विविध फायदे समजावून सांगण्यात आले.

चार सूत्री भात लागवड पद्धतीचे फायदे

  • उत्पादन वाढ : या पद्धतीमुळे भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • पाण्याचा कार्यक्षम वापर :  पाण्याची बचत होते आणि पाण्याचा अधिक प्रभावीपणे वापर होतो.
  • खतांचा योग्य वापर : खतांचा योग्य वापर होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
  • रोग आणि कीड नियंत्रण: पिकांवरील रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
  • श्रम आणि वेळेची बचत : पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेळात आणि कमी श्रमात लागवड करता येते.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment